ऑनलाइन सुरक्षित रहा
`
1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 या एक वर्षाच्या कालावधीसाठी भारताने G20 च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. G20 किंवा ग्रुप ऑफ ट्वेंटी हा जगातील प्रमुख विकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्थांचा एक आंतरसरकारी मंच आहे. यात 19 देश (अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, यूके, अमेरिका) आणि युरोपियन युनियन (EU) यांचा समावेश आहे. एकत्रितपणे, G20 चा जागतिक जीडीपीमध्ये 85%, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये 75% आणि जागतिक लोकसंख्येमध्ये दोन-तृतियांश वाटा आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्यासाठी हा प्रमुख मंच आहे.
भारताचे G-20 चे अध्यक्षपद भूषवताना, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा व्यापक वापर आणि डिजिटल पेमेंटचा जलदगतीने अवलंब करण्याताना ऑनलाइन जगात सुरक्षित राहण्यासाठी विशेषत: सक्षम व्यक्तींसह नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) 'ऑनलाईन सुरक्षित रहा' नावाचे अभियान राबवत आहे. भारत ट्रिलियन डॉलरची डिजिटल अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने लक्षणीय प्रयत्न करत असताना, हे अभियान सर्व वयोगटातील वापरकर्त्यांना ऑनलाइन जोखीम आणि सुरक्षा उपायांबाबत संवेदनशील करण्यावर लक्ष केंद्रित करते आणि सायबर हायजिनला प्रोत्साहन देऊन नागरिकांची सायबर सुरक्षा अधिक मजबूत होईल यासाठी प्रयत्न करते.
राज्य सरकार ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व वयोगटातील नागरिक, विशेषतः मुले, विद्यार्थी, महिला, शिक्षक, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विशेष-सक्षम व्यक्ती, केंद्र व राज्य सरकार अधिकारी यांच्या वर भर देऊन त्यांना 'ऑनलाईन सुरक्षित रहा' अभियानात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत आहे.
MeitY, भारत सरकार द्वारे ऑनलाईन सुरक्षित रहा अभियान
पासवर्ड सुरक्षा
बनावट कर्ज