75 लाख पोस्टकार्ड अभियान
शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या सहकार्याने टपाल विभागाला पोस्टकार्ड अभियानाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
मोहीमे अंतर्गत, इयत्ता चौथी ते बारावीचे 75 लाख विद्यार्थी हे स्वातंत्र्यलढ्याचे अनसंग हिरो आणि माय व्हिजन फॉर इंडिया इन 2047 या दोन विषयांवर हिंदी / इंग्रजी / कोणत्याही अनुसूचित भाषेत माननीय पंतप्रधानांना पोस्ट कार्ड लिहितील अशी कल्पना होती.
01 डिसेंबर 2021 पासून ते 20 डिसेंबर 2021 पर्यंत हे अभियान राबविण्यात आले
देशभरातील सुमारे 10,000 पोस्टल अधिकारी आणि कर्मचारी 1.13 लाखांहून अधिक शाळांना पोस्ट कार्ड विकण्यासाठी, शाळांना त्यांच्या संबंधित शाळांमध्ये पोस्ट कार्ड लेखन सत्र आयोजित करण्यासाठी, शाळा अधिकाऱ्यांकडून पोस्ट कार्डचे मूल्यमापन करून घेण्यासाठी आणि प्रत्येक शाळेतील 10 सर्वोत्तम प्रवेशिका मिळवण्यासाठी एकत्रित करण्यात आले होते. CBSE आणि मायगव्ह पोर्टलवर अपलोड केले, कार्डे गोळा केली आणि दिल्लीला विशेष बॅगमध्ये पाठवली.
आतापर्यंत देशभरातील 64,201 शाळांमधील एकूण 1.07 कोटी विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले आहेत.
देशभरातील विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना संबोधित केलेल्या 1.37 कोटींहून अधिक पोस्टकार्ड ची खरेदी केल्यामुळे या अभियानाची मुदत 31.12.2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
या अभियानाला मिळणारा भरघोस प्रतिसाद केवळ भारतापुरता मर्यादित नाही तर परदेशातही आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने या अभियानात 12 देशांच्या 42 शाळांनी यापूर्वीच सहभाग घेतला असून 19,000 हून अधिक विद्यार्थ्यांनी माननीय पंतप्रधानांना पोस्टकार्ड लिहून दिले आहे.
या अभियानावर लघु पट बनवण्याचे कामही विभागाकडून सुरू असून गिनीज रेकॉर्ड म्हणून त्याची नोंदणी करण्याची आमची योजना आहे.
येत्या काळात पंतप्रधान कार्यालयात ही पोस्टकार्डे पोहोचवण्याच्या पद्धतींना अंतिम स्वरूप देण्याबाबत सांस्कृतिक मंत्रालयाशी सल्लामसलत करून विभाग काम करत आहे.